साहित्य :-
- ४ वाटी भिजलेले तांदूळ
- अर्धा किलो मटण
- २ वाट्या कोथिंबीर
- ४ ते ५ हिरव्या मिरच्या
- ५ ते ६ काळीमिरी
- २ वेलची
- तमालपत्र
- अर्धा चमचा शहाजिरे
- अर्धा कप दही
- १ लिंबाचा रस
- २ चमचे पुदिना
- ४ मोठे चमचे तेल
- २ मोठे कांदे उभे चिरलेले
- अर्धा चमचा हळद
- १ चमचा आलं-लसूण पेस्ट
- २ उकडलेली अंडी
- मीठ चवीनुसार
- मटणामध्ये मीठ व हळद टाकून कुकरमध्ये ४ शिट्या करून घ्यावे.
- एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात शहाजिरे, वेलची, दालचिनी, काळीमिरी टाकावी.
- खडा मसाला भरून झाल्यानंतर त्यात कांदे लालसर परतून घ्यावे.
- मिक्सरमध्ये आलं-लसूण पेस्ट,कोथिंबीर,हिरव्या मिरच्या वाटून ते मिश्रण त्या पातेल्यात टाकणे.
- दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण परतल्यानंतर त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी टाकणे.
- हे मिश्रण उकळल्यानंतर त्यात केवळ भिजलेले तांदूळ, फेटलेले दही, बारीक चिरलेला पुदिना, लिंबाचा रस टाकून भात शिजून ठेवणे.
- भात अर्धा शिजल्यानंतर त्यात शिजलेले मटण टाकणे.
- भात शिजत आल्यानंतर गॅसवर तवा गरम करणे व मंद आचेवर झाकण लावून भात मुरायला ठेवणे.
- दहा मिनिटानंतर गॅस बंद करणे.
- उकडलेल्या अंड्याने भात गार्निश करणे.
No comments:
Post a Comment