आपण आज मिश्र कडधान्यांची खिचडी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत.
साहित्य :-
- २ वाट्या तांदूळ
- प्रत्येकी १ चमचा राजमा
- काबुली चणे
- चवळी
- मूग
- मसूर रात्री भिजवा व फार मऊ शिजणार नाहीत अशी कडधान्ये शिजवा.
- २ लांब कांदे चिरलेले
- आलं-लसूण पेस्ट
- १ इंच दालचिनी
- ४ लवंग
- ४ मिरी.
कृती :-
- थोड्या तेलावर कांदे तळून काढून घ्या. त्यात धुतलेले तांदूळ घालून परता. कडधान्ये व मसाला, आलं, लसून, मीठ, साखर, लिंबाचा रस घाला व खिचडी शिजवा. वर खोबरं, कोथिंबीर पेरा. ही खिचडी थंडीत फारच रुचकर लागते.

No comments:
Post a Comment